कल्याण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले. पत्रीपूल येथे स्नेह वर्धक नगरच्या वतीने साकारण्यात आलेला देखावा आंबेडकरी जनतेच्या चर्चेचा विषय ठरला होता.
‘जखडबंद पायातील साखळदंड तटातून तुटले ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भिमा तुझ्या जन्मामुळे’ हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला. यामध्ये भारतीय संविधान आणि संसद भवन साकारण्यात आले आहे.
हा देखावा पत्रकार अशोक कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून याची सजावट कैलास कांबळे, नदीम शेख, स्नेह वर्धक मित्र मंडळाने केली आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू